धर्मवीर अध्यात्मिक सेना

शिवसेना मुख्य नेते तथा मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची पक्षाविषयी भूमिका

"जनतेच्या सेवेसाठी, धर्मनिष्ठ नेतृत्वासाठी आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व विचारसरणीच्या मार्गावर अविरत वाटचाल"

       मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब हे शिवसेनेचे अनुभवी, दूरदृष्टी ठेवणारे आणि जनतेच्या मनातील नेता म्हणून ओळखले जातात. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य करतात.त्यांच्या विचारांचा गाभा म्हणजे – निर्भीड निर्णय, जनतेशी प्रामाणिक नाळ आणि हिंदुत्वाशी अभंग निष्ठा.

       "शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून ती सामान्य जनतेच्या आत्मसन्मानाची आणि स्वाभिमानाची चळवळ आहे" – या तत्त्वावर त्यांनी नेहमी ठामपणे उभे राहून कार्य केले आहे.

       मा. शिंदे साहेबांचे नेतृत्व हे जनतेच्या अडचणी सोडविणारे, प्रशासनाला गतिमान करणारे, आणि तरुणांना नवचैतन्य देणारे ठरले आहे. त्यांनी महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, तरुण, महिला आणि वंचित घटकांसाठी अनेक निर्णय घेतले असून, ते विकास आणि संस्काराचे संतुलन राखणारे नेतृत्व आहे. "शिवसेना म्हणजे शिस्त, शिवसेना म्हणजे संस्कार, आणि शिवसेना म्हणजे संघर्षातून निर्माण झालेला नवा विश्वास" — हे तत्व मा.एकनाथजी शिंदे साहेब सातत्याने जपत आहेत.

शिवसेना पक्षाचा इति प्रवास

स्थापना व प्रारंभ (१९६६)

२७ जून १९६६ रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाला न्याय, रोजगार व स्वाभिमान मिळवून देणे. हि पक्षाची मूळ भूमिका होती.

मराठी अस्मिता आंदोलन (१९७०)

महाराष्ट्रात प्रथम प्राधान्य मराठी माणसाला’ या घोषणेसह, स्थानिक रोजगार हक्कासाठी आंदोलने. मुंबई, ठाणे, पुणे येथे संघटनात्मक बळ वाढवले.

राजकारणात प्रवेश (१९८०)

महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने विजय मिळवत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाव निर्माण केला. हिंदुत्वाचा स्पष्ट अंगीकार – रामजन्मभूमी चळवळीत सक्रिय सहभाग.

भाजपसोबत युती आणि सत्ता (१९९५)

१९९५ साली शिवसेना-भाजप युतीने राज्यात सरकार स्थापन केले. मनोहर जोशी मुख्यमंत्री व नारायण राणे नंतरचे मुख्यमंत्री.

हिंदूत्व व राष्ट्रवादाची धार (२०००)

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने आपली ओळख हिंदू राष्ट्रवाद आणि सामाजिक न्यायावर आधारित पक्ष म्हणून प्रस्थापित केली. धर्मवीर आनंद दिघे यांचा प्रभाव (ठाणे विभाग): लोककल्याणकारी कार्य, निस्वार्थी संघटनशक्ती आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी निर्माण. दिघे साहेबांची कार्यपद्धती आजही शिवसेना संस्कृतीचा भाग आहे.

नेतृत्व बदल व नवे पर्व (२०१० - २०२०)

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा उद्धव ठाकरे यांनी सांभाळली. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना मुख्यमंत्रीपदावर (उद्धव ठाकरे). मात्र 2020 मध्ये काँग्रेस सोबत हातमिळवणी करत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदूत्ववादी विचारांना तिलांजली दिली.

एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवे दिशा (२०२२ – आजपर्यंत)

शिवसेना पक्षात मोठी स्थित्यंतरे. मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्हा हिंदुत्वाचा मार्ग पकडला आणि भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जनहिताचे निर्णय, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि धर्मवीर विचारांचा प्रभाव. शिवसेना हा पक्ष फक्त राजकारणापुरता मर्यादित नाही, तर तो सामान्य माणसाच्या संघर्षाचा इतिहास आहे. मराठी स्वाभिमान, हिंदू अभिमान आणि जनतेच्या हक्कासाठी ही चळवळ आजही प्रखरतेने सुरू आहे.

स्थापना व प्रारंभ (१९६६)

२७ जून १९६६ रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाला न्याय, रोजगार व स्वाभिमान मिळवून देणे. हि पक्षाची मूळ भूमिका होती

मराठी अस्मिता आंदोलन (१९७०)

‘महाराष्ट्रात प्रथम प्राधान्य मराठी माणसाला’ या घोषणेसह, स्थानिक रोजगार हक्कासाठी आंदोलने. मुंबई, ठाणे, पुणे येथे संघटनात्मक बळ वाढवले.

राजकारणात प्रवेश (१९८०)

महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने विजय मिळवत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाव निर्माण केला. हिंदुत्वाचा स्पष्ट अंगीकार – रामजन्मभूमी चळवळीत सक्रिय सहभाग.

भाजपसोबत युती आणि सत्ता (१९९५)

१९९५ साली शिवसेना-भाजप युतीने राज्यात सरकार स्थापन केले. मनोहर जोशी मुख्यमंत्री व नारायण राणे नंतरचे मुख्यमंत्री.

हिंदूत्व व राष्ट्रवादाची धार (२०००)

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने आपली ओळख हिंदू राष्ट्रवाद आणि सामाजिक न्यायावर आधारित पक्ष म्हणून प्रस्थापित केली. धर्मवीर आनंद दिघे यांचा प्रभाव (ठाणे विभाग): लोककल्याणकारी कार्य, निस्वार्थी संघटनशक्ती आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी निर्माण. दिघे साहेबांची कार्यपद्धती आजही शिवसेना संस्कृतीचा भाग आहे.

नेतृत्व बदल व नवे पर्व (२०१० - २०२०)

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा उद्धव ठाकरे यांनी सांभाळली. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना मुख्यमंत्रीपदावर (उद्धव ठाकरे). मात्र 2020 मध्ये काँग्रेस सोबत हातमिळवणी करत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदूत्ववादी विचारांना तिलांजली दिली.

एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवे दिशा (२०२२ – आजपर्यंत)

शिवसेना पक्षात मोठी स्थित्यंतरे. मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्हा हिंदुत्वाचा मार्ग पकडला आणि भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जनहिताचे निर्णय, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि धर्मवीर विचारांचा प्रभाव. शिवसेना हा पक्ष फक्त राजकारणापुरता मर्यादित नाही, तर तो सामान्य माणसाच्या संघर्षाचा इतिहास आहे. मराठी स्वाभिमान, हिंदू अभिमान आणि जनतेच्या हक्कासाठी ही चळवळ आजही प्रखरतेने सुरू आहे.

नेतृत्व

Animated Card Hover Effect Html & CSS

मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब

शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

मा.ना.श्री एकनाथजी संभाजी शिंदे साहेब हे एक भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत.शिंदे हे महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री देखील आहेत. २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथजी शिंदे साहेब हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते.

Animated Card Hover Effect Html & CSS

मा. खा. डॉ श्रीकांतजी एकनाथजी शिंदे

खासदार,कल्याण लोकसभा,युवा शीर्ष नेतृत्व

डॉ. श्रीकांतजी एकनाथजी शिंदे साहेब यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांचा २.५० लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. २०१४ मध्ये, भारतात ३५ वर्षांखालील ३२ पहिल्यांदाच खासदार झाले.

Animated Card Hover Effect Html & CSS

ह.भ.प श्री अक्षयमहाराज भोसले

प्रदेशाध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना

ह.भ.प.श्री अक्षयमहाराज भोसले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिजवडी या गावचा. लहानपणीच मातु:श्री धनश्री यांच्याकडून आध्यात्मिक संस्काराचे बाळकडू.

ध्येय व धोरण

"मराठी माणसाचा अभिमान, हिंदुत्वाचा बुलंद आवाज आणि जनतेच्या न्याय्य हक्कासाठी सातत्याने संघर्ष." शिवसेना पक्षाचे प्रमुख ध्येय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराची प्रेरणा घेऊन समाजात न्याय, स्वाभिमान आणि सुरक्षितता निर्माण करणे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीप्रमाणे, हिंदू समाजाच्या हिताचे संरक्षण करणे, मराठी जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणे, आणि सर्वसामान्य माणसाला सत्तेच्या केंद्रस्थानी आणणे हे शिवसेनेचे मूलभूत ध्येय आहे.

धर्मनिरपेक्षतेच्या चौकटीत राहून हिंदू संस्कृती, परंपरा आणि विचारांचे जतन व संरक्षण. देशाच्या आत्मसन्मानाशी जोडलेली हिंदुत्ववृत्ती बाळगणे.

महाराष्ट्रात मराठी जनतेला सर्वच क्षेत्रात अग्रस्थान मिळावे यासाठी धोरणात्मक प्रयत्न. स्थानिक रोजगार, शिक्षण व संधींमध्ये मराठी युवकांना प्राधान्य.

शहर व ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण, आणि तरुणांसाठी नवउद्योजकतेला प्रोत्साहन.

सर्व धर्म, जाती आणि वर्गांमध्ये समता, बंधुता आणि सामाजिक सलोखा राखत सर्वांना न्याय देणारी भूमिका.

प्रशासनामध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमतेला प्राधान्य. भ्रष्टाचाराविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण.

भारताच्या सार्वभौमत्वासाठी कटिबद्ध राहून, देशाच्या सुरक्षेसाठी व शौर्य परंपरेसाठी कठोर भूमिका घेणे